'ना-ना' त-हेचि नाटकं - भाग:२
समन्वयक, परीक्षकांनी केला गुंता सोडविण्याचा प्रयत्न
हा गुंता सोडविताना समन्वयक राजेश जाधव म्हणाले की, 'गोदो'बद्दल फार कोणाचा रोष नाही. रोष आहे तो गाय्धानिंच्या 'रात्र काळी घागर काळी' या नाटक्बद्दल. हे नाटक वेगळ्या नावाने आधी दोन वेळा सादर झाले आहे. आता नियम ३ क़ असे सांगतो की, एकाच नाटक एकाच संस्थेला पुन्हा सदर करता येणार नाही. पण, या संस्थेने त्याचे ना बदलून वा त्यात अंतर्गत काही बदल केले असतील आणि त्यांना शासनाने प्रमाणपत्र दिले असेल तर आपण किंवा परीक्षक काय करणर? यासाठी सहभागी संस्थांनी स्पर्धेपूर्वीच पावलं उचलायला हवी. शहरात कोणती संस्था काय सदर करणर आहे, याची चर्चा होत असते. मग त्याच वेळी इतर संस्था आक्षेप का घेत नाहीत? समन्वयक हा संघ आणि शाषण यांच्यातील दुवा आहे. तो काय करणर?
तर याच गोंधळावर परीक्षक भाग्यश्री काळे यांनीही भाष्य करताना सांगितले की, हा निकाल अगदी चांगला लागला आहे. आता 'रात्र काळी घागर काळी'यावरून जो वाद होतो आहे, त्याला दोन बाजू आहेत या संघाने नियमाप्रमाणे पूर्तता केलेली आहे. त्याला शासन किंवा परीक्षक काही करू शकत नाही. नाटकही य्त्तम होते. तरीही मी स्वत: शासनाला विनंती करणार आहे की, सर्व परीक्षकांची बैठक घेऊन या जुन्या आणि नवीन नाटकांबद्दल काही तरी तोडगा काढावा. खरतर नवीन संहिता यायलाच हव्यात. नेताजी भोइरन्सर्खे ज्येष्ठ कलावंत दरवर्षी नवीन नाटक लिहून सादर करतात. तर मग इतरांनी का करू नये? उलट यंदा शासनाने समन्वयक नेमल्याने स्पर्धा उत्तम झाली. सांस्कृतिक खात्याच्या संचालकांना येथे येउन त्याची दाखल घ्यावी लागली. हे कमी आहे का?
No comments:
Post a Comment